Skip to main content
तुला कळणार नाही....

राधाने पंचेचाळीशी गाठलेली....
दोन मुल...अथर्व आणि आराध्या।।।
तिचा नवरा श्याम एका प्राईवेट कंपनी मधे जॉब ला।।
राधाच आयुष्य या तिघांभोवती फिरत।।।
सकाळी नवरा जायची घाई,नंतर मुलांचा नास्ता,त्यांच्या वस्तु शोधून दया।।।
आई माझ हे मिळत नाहीये।।आई माझ हे अस का ठेवलय???.......
या वाक्यांची जणु सवयच झालेली।।।
दहावी पास "राधा" दिसायला सुंदर होती।।।सावळा वर्ण,लांब केस,मोठे पाणीदार डोळे अगदी उत्साही होती राधा।। लग्नानंतर एकत्र कुटुंबात आली।।जावा,नंदा,सासुसासरे लहान मुलं अस भरलेल्या घरात।।
काळा नुसार सासुसासरे गेल्यानंतर सगळे वेगवेगळे झाले।।आता सणासुदीला भेटतील तेवढेच।।।।
राधा संसार मुलाबाळांत एवढी रमली होती की स्वताला पण असं वेगळ आयुष्य आहे हेच विसरली बहुदा।।।
पण कोणतीही गोष्ट अति झाली की माती होते अगदी असच काहीस घडत होत राधाच्या बाबतीत।।।
आराध्या आता कॉलेजमधे होती..
आराध्याला वाटत होत की आपण आता फार मोठे झालो आहोत ।।आपल्याला कुणाला काही विचारायची काही गरज नाहीये।।। तिने एकदा सांगितल आणि तिच्या बाबाने तिला नवीन लॅपटॉप आणला।।तर अथर्व तर लाडकाच होता।।आपण मागु ते मिळेल,असा ग्रह होता त्यांचा।। राधाला मात्र हे खटकत होत...मुलांना एकदा सवय लागली की त्यांना पैशाची किंमत राहत नाही असं म्हणन होत तिच।। तर श्याम ला वाटत होत की आजची पिढी प्रगतशील आहे त्यांना अस अडवन ठीक नाही।।। तो प्रत्येकवेळी राधालाच गप्प बसवत असत, "तुला कळणार नाही"!! जाऊदे।।।
आराध्या एकदा आपल्या फ्रेंड्स सोबत बाहेर गेली होती यायला फारच वेळ झालेला।।ती येईपर्यंत राधाच्या दाराजवळ दहादा फेऱ्यामारुन झालेल्या।।। ती आली तेव्हा राधाचा जीव भांड्यात पडला,पण नेहमीप्रमाणे...आई प्लिज लेक्चर देऊ नको,"तुला नाही कळणार"!!! हा टॅग मुलीने लावला राधावर।।।
अथर्व...आई चा लाडका तसा,पण सतत मोबाईल मधे घुसलेला।।।।
अरे दोन मिनीट मान वर करून पाहशील का??काय वाढलय ताटात ते!!!  अस ती तीनचार वेळा बोलल्यावर त्याचीहि प्रतिक्रिया....थांब ग जरा, खूप महत्वाच आहे,"तुला नाही कळणार"!!!!
राधा ला जशी काही सवयच झालेली या गोष्टींची।।।
एक दिवस भाजीला गेलेल्या राधाला अथर्वची टिचर भेटली।।।
तेव्हा समजल.... कि तिला शाळेत बोलावल होत,तर तिच्या पठ्याने तिला चक्क आजारी पाडलं।। मिस ने तब्बेतीची चौकशी केली।। तर मुलाला वाचवण्यासाठी तर तिला खोट बोलव लागलं की ती खरच आजारी होती ।।।।
आता मात्र राधा चांगलीच पेटली.....
त्यादिवशी जवळ जवळ तासभर ती आराश्यासमोर बसुन होती।।स्वतःलाच निहाळत।।। तिला तीच प्रतिबिंब दिसत होत पण...ते खूप थकलेल,हरलेल!! जणु काही तिच मन हि तिच्यावरच हसत होत।। डोळे भरलेले होते मात्र अश्रु खाली नव्हते पडत।।। काही वेळानंतर ती ताडकन उठली जस काही निर्धार केल्यासारखी!!! डोळ्यात साठलेले अश्रु जणु काही गिळले तिने, आणि नव्या जोशात आली।।।
कपाटातून तिन नवी कोरी साडी काढली छान तयार झाली।।। कपाळावर छानशी टिकली,डोळ्यात काजळ ,ओठाला लिपस्टिक आणि पायात पैंजण अगदी मनसोक्त नटली।।। डोक्यात गुलाबाचं फुल हि घातल।।  कापाटातून एक छोटीशी पर्स काढली जी श्यामनेच तिला दिली होती पण तिने ती कधी वापरली नव्हती,म्हणजे तशी तिला त्याची गरज नव्हती वाटली..पण आज तिने ती मुद्दामून घेतली आणि काही निर्धाराने ती घराबाहेर पडली।।।
अथर्व शाळेतुन आला तर दार बंद!!काही वेळाने आराध्या हि आली।।। तिने राधा ला फोन हि केले पण तिने उचलले नाही।।
बराच वेळ दोघेही घराबाहेर बसले होते।। आराध्या ने श्याम ला फोन करून सांगतील होत आधीच त्यामुळे तो हि आला,पण राधाचा पत्ता नव्हता।।। आणि दुसरी किल्ली ठेवण्याचा कधी प्रश्नच आला नाही कारण राधा तर घरीच असायची पण आज????
खूप वेळानंतर राधा घरी परतली।।।
मग काय सगळ्यांनी तिच्यावर प्रश्नांचा भडिमार सुरु केला।। राधा मात्र शांत होती तिच्या चेहऱ्यावर मात्र ना दुःख होत,ना पश्चाताप।।।।
तिने दार उघडलं आणि सगळे आत गेले।।।
ती किचन मधे गेली,काही वेळानंतर परत बाहेर आली ती सगळ्यांसाठी चहा घेऊन।। तिने चहाचा ट्रे खाली ठेवला स्वताचा चहा घेऊन सोफ्यावर बसली।।
आई तुला माहितेय ना मला ग्रीन टी लागते!!आराध्या चिडत बोलली।।   राधा ने फक्त एक नजर टाकली तिच्यावर, आराध्या समजून गेली होती की आज काहितरी वेगळ घडलंय हि रोजची आई नाहीये।।।
सगळ्यांनी काही न बोलता चहा घेतला।। श्याम ने परत तोच विषय काढला।।कुठे गेलेली?? का गेलेली?? मुल किती वेळ बाहेर उभी होती ईत्यादी ईत्यादी......
तिने त्याच सगळ आधी ऐकून घेतल आणि बोलायला सुरुवात केली....
मी ते स्मार्टफोन घ्यायला गेलेले।।नंतर वाटेत मला माझी मैत्रीण भेटली ती एक क्लब चालवते। तिच्या सोबत तिथे गेले ।। मग तिथे नाव नोंदवल तिन सगळ्यांशी ओळख करून दिली ,थोडा वेळ गप्पा मारल्या मग तिथेच गणपतीच मंदिर होत तिथे दर्शन 

Comments

Popular posts from this blog

MARATHI SUVICHAR, MARATHI QUOTES (मराठी सुविचार)

वेळ काढून नक्कीच वाचा खुप काही समजून घेण्या सारखं आहे १) सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. २) आयुष्यात भावने पेक्षा कर्तव्य मोठे असते. ३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान ४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही. ५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला. ६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे. ७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं. ८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास. ९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस १०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस ! ११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं. १२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात. १३) आपण जे पेरतो तेच उगवतं. १४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये. १५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो. १६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम. १७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा. १८) आधी विचार करा; मग कृती करा. १९) आय...

Rajratan Dhutraj

Rajratan Dhutraj....  Different types of photograph  Rajratan Dhutraj 
पोलखोल संघाची.नक्की वाचा. श्रीमंत कोकाटे अहमदनगर येथील भाजपाचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी शिवाजीमहाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले भाजप वगळता सर्व पक्ष संघटना यांनी रस्त्यावर येऊन छिंदमचा निषेध केला, अगदी तो ज्या पद्मशाली समाजातून येतो त्यानेदेखील त्याचा तीव्र शब्दात निषेध केला. पोलिसांनी त्याला अटकदेखील केलेली आहे. ही विकृती एकट्या छिंदमपुरती मर्यादित नाही तर छिंदमची जडणघडण ज्या परिवारात झाली तो परिवार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघचा. छिंदमचे ज्या गणवेशात छायाचित्र समाजमाध्यमांवर फिरते आहे त्यावरून हे पुरेसे स्पष्ट आहे. छिंदमच्या वक्तव्याबाबत संपूर्ण संघाला जबाबदार धरता येणार नाही, असा युक्तिवाद केला जातो पण शिवाजीराजे-संभाजीराजे यांची बदनामी करणारे संघीच कसे? संघाचे बायबल म्हणून ज्या ग्रंथाचा उल्लेख केला जातो त्या “विचारधन”(bunch of thoughts) या ग्रंथात देखील दिवंगत सरसंघचालक गोळवलकर गुरुजी म्हणतात”संभाजी म्हणजे मदिरा आणि मदिराक्षीमध्ये बरबाद झालेला पापी,दारुडा आणि व्यभिचारी होता” याच ग्रंथावर संघाच्या पिढ्यानपिढ्या पोसल्...