Skip to main content
*श्रीदेवी ची अचानक एक्सिट*
*हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट यामध्ये नेमका फरक काय असतो ?*

अपुरी झोप, व्यस्त जीवनशैली यामुळे हृद्यावर वाढणार्‍या दाबाचा आणि त्यातून मृत्यू ओढावू शकणार्‍या या समस्यांबाबत नक्की जाणून घ्या.

आजकाल व्यस्त जीवनशैलीमुळे तरुणांपासून वयोवृद्धांमध्ये हृद्यविकार जडण्याचे प्रमाण वाढते आहे. अशाच हृद्यविकाराच्या झटक्यामुळे भरत नाट्य मंदिरात 'नाट्यत्रिविधा' कार्यक्रमादरम्यान गिरकी घेऊन कोसळलेली अभिनेत्री अश्विनी एकबोटे असो. ऐन उमेदीच्या काळात हृद्यविकाराने त्यांचे जाणे मनाला चटका लावणारे ठरले होते .... सुप्रसिद्ध अभिनेत्री रीमा लागू आणि काल रात्री एका विवाह सोहळ्यासाठी गेलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी हिचा कार्डियक अरेस्ट मूळे दुःखद निधन झाले
कार्डियक अरेस्टमूळे मृत्यूचे प्रमाण खूपच वाढत आहे


हद्यविकार म्हणजे केवळ हार्ट अटॅक नव्हे. तर काही वेळेस कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळेदेखील मृत्यू ओढावू शकतो. पण मग कार्डिअ‍ॅक अरेस्ट म्हणजे नेमके काय हे नक्की जाणून घ्या .

कार्डिअ‍ॅक अरेस्ट आणि हार्ट अटॅक यामध्ये फरक काय ?

कार्डिअ‍ॅक अरेस्ट ही एक स्थिती असते. ज्यामध्ये हृद्याचे पंपिंग होणं आणि रक्ताभिसरणाचे कार्य थांबते. अनेकदा हार्ट अटॅक आणि कार्डिअ‍ॅक अरेस्ट यामध्ये लोकांची गफलत होते. रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेजेसमुळे हृद्याला रक्तपुरवठा करण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा येऊ शकतो. परिणामी हार्ट अटॅक येतो.

कार्डिअ‍ॅक अरेस्टमध्ये रक्तप्रवाहादरम्यान शरीरात इतर अवयवांना ऑक्सिजन पुरवण्याच्या कार्यात अडथळा येतो.
मेंदूला ऑक्सिजनच्याअभावी त्याच्या कार्यातही अडथळा येतो. अशावेळेस श्वासावरील नियंत्रण सुटते, शुद्ध हरपते.कार्डिअ‍ॅक अरेस्ट ही एक 'मेडिकल इमरजन्सी' असून त्यावर तात्काळ उपचार करणे गरजेचे असते.

कार्डियक अरेस्ट अचानकच होतो. विशेष म्हणजे ज्यांना ह्रदयासंबंधी आजारपण आहे, त्यांना कार्डियक अरेस्ट होण्याची शक्यता जास्त असते.

कधी-कधी कार्डियक अरेस्ट अगोदर छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास, पल्पीटेशन, चक्कर येणे, शुद्ध हरपणे, थकवा किंवा ब्लॅकआउट होऊ शकते.

याच्या उपचारासाठी रुग्णास कार्डियोपल्मोनरी रेसस्टिसेशन (सीपीआर) दिले जाते, ज्यामध्ये ह्रदयाच्या गतीला नियमित केले जाऊ शकते. शिवाय या रुग्णांना ‘डिफाइब्रिलेटर’ने विद्युत शॉक देऊन हार्ट बीटला नियमित करण्याचा प्रयत्न केला जातो

हृद्याच्या अनेक विकारांमुळे कार्डिअ‍ॅक अरेस्टचा धोका वाढतो.

*कार्डीअ‍ॅक अरेस्टची काही लक्षण - *

अचानक चक्कर येणं,

थकवा जाणवणं,

डोळ्यासमोर अंधारी येणं,

छातीत वेदना जाणवणं,

दम लागणं

कार्डीअ‍ॅक अरेस्ट हा अनेकदा कोणतेही लक्षण किंवा संकेत न देता येऊ शकतो म्हणूनच स्वतःची थोडी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे

*हार्ट अटॅक चा धोका वेळीच ओळखण्याचे '5' संकेत*

हृद्यविकाराचा झटका वेळीच ओळखण्यासाठी या लक्षणांकडे मूळीच दुर्लक्ष करू नका

कोणताही आजार धोकादायक स्थितीपर्यंत जाण्याआधी शरीर आपल्याला वेळोवेळी त्याचे संकेत देत असतो. परंतू या संकेतांकडे आपल्याकडूनच लक्ष दिले जात नाही. त्यामुळे अनेकदा हृद्यविकाराचे आजार आणि झटका हा सायलंट किलर ठरतो.

 म्हणूनच  ही ‘5’ लक्षण लहानसहान वाटत असली तरीही त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

1.थकवा/ दम लागणे –

कमी झोपेमुळे, कामचा खूप ताण असल्यास किंवा सतत जंकफूड खाणे  यामुळे काहींना थकवा जाणवू शकतो. परंतू हृद्याचे कार्य कमजोर झाल्याने आलेला थकवा थोडा वेगळा असतो.थकव्यासोबतच दम लागत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. हृद्याच्या कार्यात बिघाड झाल्यास रक्ताभिसरणाच्या कार्यातही अडथळा निर्माण होतो. त्याच्या परिणाम फुफ्फुसांच्या कार्यावरही होतो. त्यामुळे थोडेसे अंतर चालणेही दमछाक करणारे ठरत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.

2. छातीतून सुरू होणार्‍या कळा खांदा आणि गालाजवळ जाणावणे

काही वेळेस लहान सहान कारणांमुळे जाणवणारी छातीदुखी ही आराम केल्यानंतर ठीक होते. सतत जाणवणारी छातीदुखी दुर्लक्षित न करता तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डावा हात दुखावण्यामागे, डाव्या बाजूच्या जबड्यामध्ये वेदना जाणवण्यामागे अनेक कारणं असू शकतात. त्याची वेळीच तपासणी करून योग्य निदान करणे गरजेचे आहे.

3. अपचन

हृद्याचे कार्य हळूहळू कमकुवत होण्याचे संकेत अपचनाचे लक्षण देते. पित्त आणि पचनाचे विकार केवळ पोटाच्या आजारांशी संबंधित राहत नाहीत. आवश्यकतेइतके हृद्याचे पंपिंग न झाल्यास आतड्यांना होणारा रक्तपुरवठाही कमी होतो. यामुळे पचनात बिघाड होतो. परिणामी पित्ताचा त्रास वाढतो. पित्त कमी करण्यासाठी अ‍ॅन्टासिडस घेऊनही त्रास कमी होत नसेल तर कार्डिओलॉजिस्टचा सल्ला  वेळीच घ्यावा.

4. पायांना सूज –

किडनीच्या कार्यामध्ये बिघाड झाल्यास चेहर्‍यावर, हाता-पायावर सूज

Comments

Popular posts from this blog

MARATHI SUVICHAR, MARATHI QUOTES (मराठी सुविचार)

वेळ काढून नक्कीच वाचा खुप काही समजून घेण्या सारखं आहे १) सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. २) आयुष्यात भावने पेक्षा कर्तव्य मोठे असते. ३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान ४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही. ५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला. ६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे. ७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं. ८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास. ९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस १०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस ! ११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं. १२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात. १३) आपण जे पेरतो तेच उगवतं. १४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये. १५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो. १६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम. १७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा. १८) आधी विचार करा; मग कृती करा. १९) आय...

Rajratan Dhutraj

Rajratan Dhutraj....  Different types of photograph  Rajratan Dhutraj 
पोलखोल संघाची.नक्की वाचा. श्रीमंत कोकाटे अहमदनगर येथील भाजपाचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी शिवाजीमहाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले भाजप वगळता सर्व पक्ष संघटना यांनी रस्त्यावर येऊन छिंदमचा निषेध केला, अगदी तो ज्या पद्मशाली समाजातून येतो त्यानेदेखील त्याचा तीव्र शब्दात निषेध केला. पोलिसांनी त्याला अटकदेखील केलेली आहे. ही विकृती एकट्या छिंदमपुरती मर्यादित नाही तर छिंदमची जडणघडण ज्या परिवारात झाली तो परिवार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघचा. छिंदमचे ज्या गणवेशात छायाचित्र समाजमाध्यमांवर फिरते आहे त्यावरून हे पुरेसे स्पष्ट आहे. छिंदमच्या वक्तव्याबाबत संपूर्ण संघाला जबाबदार धरता येणार नाही, असा युक्तिवाद केला जातो पण शिवाजीराजे-संभाजीराजे यांची बदनामी करणारे संघीच कसे? संघाचे बायबल म्हणून ज्या ग्रंथाचा उल्लेख केला जातो त्या “विचारधन”(bunch of thoughts) या ग्रंथात देखील दिवंगत सरसंघचालक गोळवलकर गुरुजी म्हणतात”संभाजी म्हणजे मदिरा आणि मदिराक्षीमध्ये बरबाद झालेला पापी,दारुडा आणि व्यभिचारी होता” याच ग्रंथावर संघाच्या पिढ्यानपिढ्या पोसल्...