Skip to main content
रागावर नियंत्रण करण्याचे
एक सुंदर उदाहरण --

*एका वकीला ने सांगीतलेला हृदयस्पर्शी किस्सा "* -

"नेहमीप्रमाणे बसलो होतो.
 एक पक्षकार आले.
हातात कागदाची पिशवी.
 रापलेला चेहरा.
वाढलेली दाढी.
 मळलेली कपडे.
 म्हणाले..,
" सगळ्या च जमीनीवर स्टे
लावायचा आहे. आणखी काय
कागदं पाहीजेत?
किती खर्च येईल? "

मी त्यांना बसायला सांगितलं.
ते खुर्चीवर बसले.
त्यांची सर्व कागदपत्रे तपासली.
 त्यांच्या कडून माहीती घेतली.
अर्धा पाउण तास गेला.
 मी त्यांना सांगितलं. ,
" मी अजून कागदपत्रे पाहतो.
 तुमच्या केसचा विचार करूया.
तुंम्ही असं करा
 ४ दिवसांनी परत या. "

४ दिवसांनी ते पक्षकार
 पुन्हा आले.
 तसाच अवतार.
भावा बद्दलचा राग अजूनही
 कमी झाला नव्हता.
मी त्यांना बसायची खूण केली.
 ते बसले.

मग मीच बोलायला सुरूवात
केली.
" मी तुमची कागदपत्रे पाहीली.
तुम्ही दोघे भाऊ.
एक बहीण.
आई वडील लहानपणीच गेले.
 तुमच शिक्षण ९ वी पास.
 धाकला भाऊ M.A.B.ed.
 तुंम्ही भावाच्या शिक्षणा साठी
 शाळा सोडली.
 रानात लंगोटी वर राबला.
 नेवरा दाजी च्या विहीरीवर
दगड फोडली.
 सदाबापू च्या उसात
 च-या पाडल्या.
पण भावाच्या शिक्षणाला पैसा
कमी पडू दिला नाही.
एकदा बहीण शेतात गुरं
 चारत होती.
 तुमचा भाऊ शाळेतून आला होता.
 कसा तो म्हशीच्या आडवा गेला
 आणि त्याला  शिंग लागली संपूर्ण शरीर रक्तबंबाळ झालं.
 तुंम्ही खांद्या वरून त्याला
 बोरगावला नेलं.
 खरं म्हणजे त्यावेळी तुमचं
पण कळतं वय नव्हतं....

फक्त कळती माया होती..

 आई बापाच्या मागं यांचा मीच
 आई बाप ही भावना होती...
तुमचा भाऊ B.A ला गेला.
 उर भरून आला.
 तुम्ही पुन्हा जोमानं कष्ट
 उपसायला लागला.
पण अचानक त्याला किडनीचा
 त्रास सुरू झाला.
 दवाखानं केल..
बाहेरचं केलं..
पण गुण आला नाही..
शेवटी डॉक्टर नं किडनी काढायला
 सांगितली.
तुंम्ही तुमची किडनी दिली.
ऑफिसर झाल्यावर खुप
 फिरायच आहे..
नोकरी करायची आहे..
तुला आमच्या पेक्षा लय त्रास..

आंम्ही रानातली माणसं.
 आंम्हाला एक किडनी असली
तरी चालतय.
तुम्ही बायकोच सुध्दा न
 ऐकता किडनी दिली.

भाऊ M.A ला गेला.
 होस्टेल वर रहायला गेला.
 गावात मटण पडलं..
डबा नेवून द्यावा.
 शेतात कणसं आली..
कणस नेवून द्यावी.
कुठला सण आला..
पोळ्यांचा डबा द्यावा..
घरा पासून हॉस्टेल च अंतर
२५ की.मी.
पण तुंम्ही सायकलने गेला.
 घासातला घास घातला.
भावाला नोकरी लागली..
 तुंम्ही गावात साखर वाटली..

३ वर्षीपुर्वी त्याचं लग्न झालं ..
झालं म्हणजे त्यानंच केलं.
 तुंम्ही फक्त हजर होता. पण
 तरी अभिमान होता..

भावाला नोकरी लागली.
 भावाच लग्न झालं..
आता तुम्हाला आणि बायका पोरांना
सुख लागणार होतं;
 पण झाल उलटंच....
लग्न झाल्या पासुन भाऊ घरी
 येत नाही..
बोलावलं तर म्हणतो;
मी बायकोला शब्द दिलाय..
 घरी पैसा देत नाही..
विचारलं तर म्हणतो अंगावर
कर्ज आहे..
 गेल्या वर्षी कोल्हापुरा त फ्लॅट
 घेतला.
विचारल तर म्हणतो कर्ज
 काढून घेतलाय..!! "

सगळं सांगून झाल्यावर मी
 थोडा वेळ थांबलो.

नंतर म्हणालो ...
" आता तुमचं म्हणणं आहे की
त्याने घेतलेल्या मिळकती वर
स्टे लावायचा ?

तो पटकन म्हणाला;
हो बरोबर...

मी म्हणलं;
स्टे लावता येईल.
भावाने खरेदी केलेल्या मिळकती
मधला हिस्सा पण मिळेल.
 पण......

पण तुंम्ही दिलेली कीडनी परत
मिळणार नाही.
तुम्ही भावासाठी आटवलेलं
 रक्त परत मिळणार नाही.
 तुंम्ही त्याच्या साठी खर्च केलेलं
 आयुष्य पण परत मिळणार नाही..
आणि मला वाटतयं या
 गोष्टी पुढं त्यानं घेतलेल्या फ्लॅटची
 किंमत शुन्य आहे.
त्याची नियत बदलली.
 तो त्याच्या वाटंनं गेला.
 तुंम्ही त्याच वाटेनं नको जाऊसा.
 तो भिकारी निघाला..
तुंम्ही दिलदार होता..
 दिलदारच रहा..
तुम्हाला काहीएक कमी
 पडणार नाही.. !!
उलट मी म्हणेन वडीलो पार्जित
 मिळकती मधला तुमचा हिस्सा
तेवढा पेरा.. त्याचा हिस्सा पडीक
 राहु द्या..
कोर्ट कचेरी करण्या पेक्षा मुलांना
शिकवा.. शिकुन तुमचा भाऊ
 बिघडला ;
म्हणुन पोरं बिघडणार नाहीत.. !! "

त्यान १० मिनीटं विचार केला..
सगळी कागद पिशवीत कोंबली..
डोळं पुसत म्हणाला;
"  चलतो सायेब... !! "

या गोष्टीला ५ वषॅ झाली.
 परवा तो पक्षकार अचानक
ऑफीस ला आला.
 बरोबर गोरागोमटा पोरगा.
 हातात कसली तरी पिशवी.
मी म्हटले बसा..
तो म्हणाला ,
 '' बसायला न्हाय आलो सायेब,
पेढं द्यायला आलोय ''.

हा माझा पोरगा.
 न्युझिलॅंन्डला असतो.
 काल आलाय.
 आता गावात ३ मजली घर हाय.
 ८-९ एकर शेत घेतलय.
 तुंम्ही म्हणाला होता कोर्ट
 कचेरी च्या वाटला लागु नका.

मी पोरांच्या शिक्षणा ची
 वाट धरली.. !! "

मला भरुन आलं...

हातातला पेढा हातातच राहीला..

 .    ..  ."

रागाला योग्य दिशा दिली तर
 पुन्हा रागवायची वेळ
 येणार नाही...

*कितीही कमवा*
            *पण कधी गर्व करू नका

Comments

Popular posts from this blog

MARATHI SUVICHAR, MARATHI QUOTES (मराठी सुविचार)

वेळ काढून नक्कीच वाचा खुप काही समजून घेण्या सारखं आहे १) सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. २) आयुष्यात भावने पेक्षा कर्तव्य मोठे असते. ३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान ४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही. ५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला. ६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे. ७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं. ८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास. ९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस १०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस ! ११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं. १२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात. १३) आपण जे पेरतो तेच उगवतं. १४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये. १५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो. १६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम. १७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा. १८) आधी विचार करा; मग कृती करा. १९) आय...

Rajratan Dhutraj

Rajratan Dhutraj....  Different types of photograph  Rajratan Dhutraj 
पोलखोल संघाची.नक्की वाचा. श्रीमंत कोकाटे अहमदनगर येथील भाजपाचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी शिवाजीमहाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले भाजप वगळता सर्व पक्ष संघटना यांनी रस्त्यावर येऊन छिंदमचा निषेध केला, अगदी तो ज्या पद्मशाली समाजातून येतो त्यानेदेखील त्याचा तीव्र शब्दात निषेध केला. पोलिसांनी त्याला अटकदेखील केलेली आहे. ही विकृती एकट्या छिंदमपुरती मर्यादित नाही तर छिंदमची जडणघडण ज्या परिवारात झाली तो परिवार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघचा. छिंदमचे ज्या गणवेशात छायाचित्र समाजमाध्यमांवर फिरते आहे त्यावरून हे पुरेसे स्पष्ट आहे. छिंदमच्या वक्तव्याबाबत संपूर्ण संघाला जबाबदार धरता येणार नाही, असा युक्तिवाद केला जातो पण शिवाजीराजे-संभाजीराजे यांची बदनामी करणारे संघीच कसे? संघाचे बायबल म्हणून ज्या ग्रंथाचा उल्लेख केला जातो त्या “विचारधन”(bunch of thoughts) या ग्रंथात देखील दिवंगत सरसंघचालक गोळवलकर गुरुजी म्हणतात”संभाजी म्हणजे मदिरा आणि मदिराक्षीमध्ये बरबाद झालेला पापी,दारुडा आणि व्यभिचारी होता” याच ग्रंथावर संघाच्या पिढ्यानपिढ्या पोसल्...